Wednesday, 8 April 2020

कधीही न चुकलेली चैती पाड्याची यात्रा

    

 🌹कधीही न चुकलेली  चैती पाड्याची यात्रा🌹


                *💐एक अविस्मरणीय आनंद सोहळा💐*

 आज हा लेख मुद्दाम लिहायला घेतला आणि सरकन भूतकाळ डोळ्यासमोर आला. ३५० वर्षापूर्वीची आषाढी वारीची परंपरा ज्याप्रमाणे आजतागायत रुढ आहे. *पंढरीचा वारकरी! वारी चुको न दे हरी!!* अशी मागणी ज्याप्रमाणे वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला करतो.अगदी तशीच मागणी दरवर्षी आपले नांदुरकर   ग्रामस्थ  श्री निंबा दैत्य महाराज  चरणी करतात. श्री दैत्य बाबा आमचीही चैत्री यात्रा कधीच चुकू देऊ नकोस.आणि खरोखरच माझी आतापर्यंत एकही चैत्री यात्रा चुकलेली नव्हती.अगदी परीक्षा काळातही.कधी यात्रा चुकवली नाही.आज अतिशय जड अंतकरणाने आजच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे.आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी शरीराने जरी घरात आसलो तरी मनाने मात्र श्री दैत्य बाबाच्या प्रांगणात आहोत.गेल्या पंचवीस वर्षातील चैत्री  पाडा यात्रा अनुभवली .यात्रेच्या अगोदर महिनाभर ही तयारी सुरु व्हायची.आम्ही खूप लहान होतो नवीन कपडे आणायला  खरवंडी  (फार पूर्वी तोंडोळी)कापड दुकानात दैत्य नांदूर कर गर्दी करायचे .मांजरपाट ,हरक, क्वचित टेरिकाॕट असे कापड  घेतल्यावर  दुकानाशेजारी  टेलरिंगचे दुकान असायचे तिथे सर्व जण कपडे शिवायला टाकायचे. यात्रेच्या आधी एक दिवस कपडे शिऊन मिळायचे. जयंतीचे भजन.कोणी कोणी आदल्याच दिवशी श्री संत एकनाथ महाराजांचे पैठण येथे कावडी आणण्यासाठी जायचे . तर काही जण पहाटेच काशिकेदार येथे  जाऊन खोलवर आसलेलं पाणी शेंदायचे आणि किमान यात्रेच्या दिवशी प्रत्येक जण पाच ते सहा कावडी आणायचाच.पुरती दमछाक व्हायची.पण यात्रेचा उत्साहात शीणभाग कुठल्या कुठे पळून जायचा.सर्व देवाना नारळ फोडण्यात आणि नैवद्य (तेव्हाच्या भाषेत निवाद )  घेऊन जाण्यात एक वेगळा आनंद सकाळी ७.००च्या आत.नवीन कपडे घालुन चौकातील गणपती मंदिरात हजर.मग दैत्य बाबाच दर्शन घेतल्यानंतरचा आनंद अवर्णनीय.दोन रूपयाचा प्लॕस्टिकचा  लाल चष्मा आणि एक रुपयाचे मनगटी घड्याळ घेतलं की गाडी खूष व्हायची .या वस्तूसाठी खेळणीची दुकाने पूर्वी नव्हती . बाहेरगावतील  पाहुणे तसेच गावातील बाहेरगावी असलेले सर्व नोकरदार  मंडळी तसेच गावातील सर्व  सासरला असलेल्या लेकी   आणण्यासाठी किंवा मुराळकी आणण्यासाठी गाड्या (पूर्वी बैल गाड्या )जायच्या.अनेक जण  येण्याची कसलीच सोय नसल्यामुळे भर उन्हात पायी पायी येणारांची तारांबळ होतअसे.

 श्री दैत्य बाबाचरणी असणा-या श्रध्देमुळे भाविकांना कसलाच त्रास होत नसे.  सकाळी कवडी व  त्यांची मिरवणूक अतिशय उत्साहात व आनंदात. होत होती.
गावातील लहान थोरांसह लोक लेझिम खेळत खेळत तसेच (हल्ली डी जे) क्या कर्णकडू परंतु नाचायला छान आय आवाजात नाचत नाचत हळू हळू कावडी श्री दैत्य मंदिराकडे येत. तिन्हीसांजेनंतरचा  शेरणी वाटप कार्यक्रम .त्यावेळी भेटणारे आप्तइष्ट मित्रमंडळी.भेटली की आनंद द्विगुणीत व्हायचा.क्वचित एखादी मोटर सायकल यात्रेत दिसायची.रात्रीच्या वेळी *हरिभाऊ बडे सह नंदारणी नगरकर यांचे लोकनाट्य पहाण्याचा आनंद तर  मंडळीनी अनुभवला.यात्रेत गेली आनेक वर्ष तोच तमाशा असायचा त्यातील हिरामण बडे  सोंगाड्या.आजही आठवतोय.* नंतर सकाळी  हजेरीचा कार्यक्रम व्हायचा. त्या हजेरीच्या वेळी यात्रा कमिटी तील लोक गुलाल लावायचे. तर काही लोक याला इतके द्या त्याला इतके द्या असे करत पण आनंद खूप येत होता.  दुपारी ४.००ला आखाडा सुरु व्हायचा आखाड्याची सूत्रे गावातील नामांकित मल्लांकडे असायची. (आखाडा कधी कधी मध्येच बंद पडायचा)आखाडा संपल्यानंतर मंदिराजवळ फक्त एक आणि एकच मिठाईचे दुकान असायचे. तिथे खूप गर्दी व्हायची रात्रौ ११वा श्री दैत्य बाबाचा  छबीना निघायचा शेवटपर्यंत लोक थांबायचे.दोन दिवसाची यात्रा आशा प्रकारे गुण्यागोविंदाने संपन्न व्हायची..............................आज हे सगळे दिवस डोळ्यासमोर येतात.जुन्या आठवणी उमाळुन येतात.आज पहिल्यांदाच चैत्री पाडव्याच्या यात्रेला आपण उपस्थित नव्हतो म्हणून मनातुन खूप वाईट वाटते.पण नाईलाज आहे.आज  सर्व ग्रामस्थ शरीराने देवळात नसलो तरी मनाने नक्की  आहोत.वरील भावना आपल्या सर्वांच्या मनातील आहे.केवळ त्या सर्व आठवणींना उजाळा देण्याचा सर्वांच्या वतीने केलेला हा प्रामाणिक  प्रयत्न .यात काही चुकले असल्यास क्षमस्व.जागेअभावी सर्व कार्यक्रमाचा उल्लेख करता आला नाही.आज चैती पाड्याच्या यात्रेच्या निमित्ताने.हा लेख लिहिला.आहे.आजच्या कोरोनाच्या विळख्यातुन दैत्य बाबा आपणा सर्वांना सुखरुप बाहेर काढील ही सद्भावना व्यक्त करुन पूर्ण विराम देतो.   

               भल भल निंबादैत्या महाराज की  जय 


           शब्दांकन *किरण भगवानराव नरसाळे*

No comments:

Post a Comment

मदर तेरेसा.. गाथा बलिदानाची

🇮🇳 गाथा बलिदानाची🇮🇳                                                                                    महान समाज सेविका         भारतरत्न...